Headlines :

सुख-समृद्धीसाठी सोपे उपाय!

जीवनात सुख आणि समृद्धी मिळावी असे प्रत्येक मनुष्याच स्वप्न असतं. एस्ट्रोमध्ये असे बरेचसे उपाय आहे ज्यांना नियमितपणे केल्याने तुम्ही नक्कीच सुख आणि यश मिळवू शकता.
घरातील प्रत्येक सदस्यांना सूर्योदयाच्या आधी जाग आली पाहिजे व त्यांनी सूर्याचे दर्शन केले पाहिजे. त्याच वेळेस जोराने गायत्री मंत्राचे उच्चारणं केल्याने घरात असणारे वास्तुदोष दूर होतात.
सूर्य दर्शनानंतर सूर्याला पाणी, पुष्प आणि अक्षतांचे अर्घ्य द्यायला पाहिजे.
झोपेतून उठल्यावर दोन्ही पाय जमिनीवर एकाच वेळेच ठेवायला पाहिजे आणि त्याच वेळेस आपल्या इष्ट देवाची आराधना करून आपल्या हातांना तोंडावरून फिरवायला पाहिजे.
अंघोळ व पूजा सकाळी 7-8च्या दरम्यान केली पाहिजे.
घरात तुळस आणि आकड्याचा रोप लावावे आणि त्याची नियमित सेवा केली पाहिजे.
पक्ष्यांना दाणा द्यावा.
शनिवारी व अमावास्यांच्या दिवशी संपूर्ण घराची स्वच्छता करून घरातील पसारा बाहेर काढून जोडे-चपलांचे दान केले पाहिजे.
अंघोळ केल्यानंतर बाथरुम नेहमी स्वच्छ करावे.
जेवढे जमेल तेवढे भाची-भाच्यांना भेटवस्तू दिली पाहिजे.
घरात जेवण तयार करताना गाय आणि कुत्र्याचा भाग जरूर वेगळा काढावा.
बुधवारी कुणालाही उधार नाही द्यायला पाहिजे, ते परत मिळणे अशक्य असते.
राहू काळात कुठलेही शुभ कार्य सुरू नाही केले पाहिजे.
घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या इष्ट देवाचे जप व पूजन जरूर केले पाहिजे.
घरातील सदस्यांनी अन्न, वस्त्र, तेल, अध्ययन सामुग्री इत्यादींचे दान केले पाहिजे. दान केल्यानंतर दुसऱ्यांकडे त्याचा उल्लेख करणे टाळावे.
आपल्या राशी किंवा लग्न स्वामीच्या ग्रहाच्या रंगाची एखादी वस्तू नेहमी आपल्या जवळ ठेवायला पाहिजे.
Share this article :
print this page

Post a Comment

 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2011. HINDU HERALD - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger